Hot Posts

6/recent/ticker-posts

मोदी हे नेमक बोलायला पाहिजे तेव्हाच गप्प बसतात,शरद पवार

 पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमक बोलायला पाहिजे तेव्हाच गप्प बसतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. 
रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.   
ते म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग फार बोलत नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका व्हायची. परंतु, आतादेखील नेमके बोलायला पाहिजे तेव्हाच पंतप्रधान मोदी गप्प बसतात, अशी टीका पवारांनी केली. यावेळी त्यांनी कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणावरूनही भाजपला धारेवर धरले. भाजपच्या नेत्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. आरोपींना वाचविण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये भाजपचे मंत्री सहभागी होतात. देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात इतके नादान राज्यकर्ते मी पाहिले नाहीत. 
पवार यांनी आगामी निवडणुकांच्यादृष्टीने काँग्रेसलाही इशारा दिला. आम्ही काँग्रेससोबत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत मात्र, त्यांनी काय ते सरळ सांगावे, रडीचा डाव आम्हाला पसंत नाही, असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निकालांचाही उल्लेख केला. निवडणुका जवळ आल्या आहेत. लवकर निर्णय घेऊन निवडणुका घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, उत्तर प्रदेशाच्या जनतेचे आभार मानायला हवेत. देशातील 7 ते 8 निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष हरला. कोणत्याही सत्ताधारी पक्षाला असे अपयश यापूर्वी आले नव्हते, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments