Hot Posts

6/recent/ticker-posts

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे,महापौर राहुल जाधव


केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नगरविकास विभागातर्फे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अर्बन अफेयर्स आणि इकले साऊथ एशिया यांच्या वतीने, स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका व नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. यावेळी नगरसेवक सागर गवळी, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर, शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अॅलिस पोरे, नॅशनल इन्सिट्युट ऑफ अर्बन अफेयर्सच्या उमरा अनिस आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना राहूल जाधव म्हणाले, की  पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 22 लाखाच्या आसपास गेली आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. मात्र, नागरिकांनी एकत्र येऊन जर शहराला स्वच्छ ठेवण्याचे काम केले तर, आपला परिसर, आपले शहर स्वच्छ होईल. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला अधिक चालना मिळुन आपले राज्य, आपला देश स्वच्छ होईल. या कार्यशाळेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान विषयक कामकाजावर विचारमंथन होईल व नवनवीन संकल्पना निर्माण होतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल’ असेही ते म्हणाले. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात कचरा व्यवस्थापनासाठी विविध प्रकल्प राबवण्यात येत असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्त दिलिप गावंडे यांनी दिली. तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळा देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments